उमेश पारखी

आई

मला आठवतात ते दिवस,आमच्या जीवनातले अत्यंत हलाखीचे दिवस होते ते,घरात सर्वात लहान असल्याने आई वडिलांचं अधिकचं प्रेम माझ्या वाट्याला आलं होतं आणि सर्वात लहान असल्याने आई वडिलांचा सहवास अधिक लाभला! आई वडील माझा हट्ट कोणत्याही स्थितीत पूर्ण करत असत आणि त्यावेळेस परिस्थितीही अशी होती की माझा हट्टही ना च्या बरोबरीचा असे,एखाद्या वेळेस महाग पेन घ्यावीशी […]

आई Read More »

माझा प्रवास…

■हा प्रवास साधा सोपा नव्हताच मुळी! आणि माझ्या जीवनात मी जे काही केलं ते यशस्वी होण्यासाठी नव्हतं तर ते होतं स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी!मी माझ्या जीवनात काय केलं,किती कष्ट घेतले,आज इथपर्यंत कसा पोहचलो ही तर सांगण्याची गोष्टच नव्हे,जे केलं ते स्वतःसाठी केलं आणि स्वतःसाठी केलेल्या कामासाठी स्वतःचीच पाठ मला थोपटावीशी वाटत नाही,कोरोनाच्या भयाण

माझा प्रवास… Read More »

लक्ष्मणाच्या उर्मिलेसारखे

तुझ्या निखळ हास्यावर लिहू कीतुझ्या गोड स्वभावावर लिहू,तुझ्या कोमल चेहऱ्यावर लिहू कीतुझ्या आत अनंत यातना लपवून ठेवलेल्यातुझ्या हृदयावर लिहू,माझ्याकडे ती पेनच नाही कीतुझ्या अंतर्मनाचा ठाव घेईलआणिमाझ्या मनातली शाई एका कागदावर रीती होईलएका अर्थी बरच झालं!तू असतीस सोबतीला तर पडक्या झोपडीत,अन,कौलारू घराच्या छपरातून गळणाऱ्या पाण्यात,एकाच खाटेवर छत्रीचा आडोसा घेऊनकसे दिवस काढले असतीस,खाटेच्या एका पायाला बकरी बांधलेली

लक्ष्मणाच्या उर्मिलेसारखे Read More »

विझून जाईन जरी

विझून जाईन जरीमी एकाच रातीतून,पेटेन उद्या नव्यानेमिणमिणत्या वातीतून….तप्त ज्वाला सोसल्या,घाव झाले कितीदा,भडभडत्या जखमेतून,रक्त वाहिले कितीदा,अंकुरेन उद्या नव्यानेयाच मातीतून…..विझून जाईन जरीमी एकाच रातीतून….छाटले ते पंख माझे,दगा भेटला कितीदा,दगाबाज विश्वासाने,जीव घेतला कितीदा,मुक्त होईन ना मी,बरबटलेल्या जातीतून….विझून जाईन जरीमी एकाच रातीतून….

विझून जाईन जरी Read More »

पैसा हा काळा किंवा पांढरा नसतो..

आपण जे वागतो त्याचे दूरगामी परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतात,आपण केलेली कामे,इतरांसाठी आपल्या हातून हेतुपुरस्सर वा जाणूनबुजून केलेले वाईट वा चांगले कृत्य हे भविष्यात आपली प्रतिमा कशी असेल हे ठरवीत असते,आपले वैयक्तिक जीवन त्याच बाबीवर बहरेल की उधडेल हे ठरत असते.आपण भूतकाळात केलेल्या कृत्याचे परिणाम प्रत्येकाला आपल्या भविष्यात हे भोगावेच लागतात,पुनर्जन्म वैगेरे अशी काही गोष्ट

पैसा हा काळा किंवा पांढरा नसतो.. Read More »

कायमचे हद्दपार करायचे असते

paper cutouts on a gray surface

🔸एक वेळ अशी येते की काही माणसांना,काही प्रवृत्तींना आयुष्यातून कायमचे हद्दपार करायचे असते,आपणास वापरून अलगद बाजूला करणारी,ज्या गोष्टीचा काही एक संबंध नसताना उगीच आपल्या खाजगी आयुष्यात डोकावणारी,आपल्या समोर गोड बोलून पाठीमागे आपली निंदा करणारी,स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी समोरच्याला बदनाम करणारी अशी माणसे अशा वृत्ती वेळीच ओळखून आपल्या तोंडातून एक अवाक्षरही न काढता बाजूला केल्या पाहिजेत! बऱ्याचदा

कायमचे हद्दपार करायचे असते Read More »

सौन्दर्य चिरकालीन नसतं

सौन्दर्य चिरकालीन नसतं,तसं …तारुण्य देखील चिरकालीन नसतं.सौन्दर्याचा साज आणि वयाचा माजउतरला,की जाणीव होत असते प्रत्येकाला!आठवते प्रत्येकाला,आपण भूतकाळात कसे वागलो ते…..सौन्दर्य अन् तारुण्याच्या गर्वानेदूर सारलेली माणसे,उतरत्या वयात वाटतात हवीशी,तेंव्हा नसतात कोणीही अवतीभवतीज्यांना म्हणू शकू आपली.आणि पश्चातापात जळायला लागतंते सौन्दर्य आणि तारुण्य….वयानुसार उमटतात सुरकुत्याचेहऱ्यावर, अन्ओझही वाढतं जवाबदाऱ्यांचं!तेंव्हा सारीच मस्तीअसते विझलेली……

सौन्दर्य चिरकालीन नसतं Read More »

एका संघर्षाची गोष्ट

जग बदलवू इच्छिणारे बरेच मिळतील, जग बदलवू पाहणारा एखादाच असतो-ऍड.मारोती कुरवटकर! एक संघर्षमय प्रवास!■एखादा माणूस आपल्या जीवनाचा संघर्षातून इतरांसाठी आदर्श कसा ठरतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे ऍड.मारोती कुरवटकर!गरिबी,तुरुंगवास अशा अनंत यातना भोगून व्यवस्थेच्या नाकावर टिचून वकील बनणारा आमचा मित्र मारोती!आज 25 जुलै त्याचा वाढदिवस,त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याचा जीवनप्रवास उलगडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करीत आहे,ही पोष्ट

एका संघर्षाची गोष्ट Read More »

माझं प्रिय घर

फेसबुक पोष्ट : माझ्या घराचं चित्र बघून अनेक मित्रानी मनाला सुखावून टाकणाऱ्या कमेंट्स दिल्या,मी अत्यंत सुखावून गेलो! घराला सहा वर्षे पूर्ण झाली त्याची आठवण म्हणून हा फोटो लावला होता! कोणाची नजर न लागो असे म्हणतात पण अशा नजरा माझ्या कोणत्याच गोष्टींना लागत नसतात नव्हे तशा भुक्कळ अंधश्रद्धाळू गोष्टींवर माझा विश्वास आधीही नव्हता,आत्ताही नाही,ज्या गोष्टीसाठी घाम

माझं प्रिय घर Read More »

माझा धर्म ?

इतर लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याचा विचार माणसाने कधीच करू नये,व्यक्ती तितक्या नजरा असतात,लोकांना समोरचा माणूस आपल्या मताचा,आपल्या विचाराचा असावा हीच अपेक्षा असते,लोकांच्या नजरेत आपण काय आहोत आणि त्यांना जसं हवं तसही खरं तर वागण्याची गरज नसते.प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या दृष्टिनुसार आपल्याविषयी त्याच्याकडे एक विशिष्ट असं मत बनलेलं असतं.आपण जे वागतो,बोलतो यात आपण कधीच चुकत नाही

माझा धर्म ? Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी