परिवर्तन
जीवनात काही गोष्टी अशा घडत गेल्या की माझ्यात थोडेबहुत का होईना परिवर्तन होत गेले,माझ्या जीवन जगण्याच्या तऱ्हा बदलत गेल्या,मी त्याच वेगाने बदलत गेलो,सुरुवातीला मी एक पक्का राजकारणी होतो,वडीलांपासून मिळालेले ते खानदानी गुण होते,राजकारणाच्या घोळात इतरांबद्दल द्वेषाची भावना कायम मनात रेंगाळत असायची,त्याने आपले वाईट करण्याचा प्रयत्न केला ना मग आपणही त्याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीशी वागायचं ही
बघ विसरता येत असेल तर….
रिमझिम पाऊस पडत होता,कदाचित मृगाचा तो पहिलाच पाऊस असावा! वातावरणात मंद असा मातीचा सुगंध पसरला होता,रिपरिप पडणाऱ्या पावसाचा स्पष्ट आवाज कानावर पडत होता,कित्येक वर्षानंतर मला तुला भेटायचं आहे केवळ एवढ्याच शब्दात एक मॅसेज मोबाईलवर आला होता,तिचा नंबर मोबाईलमध्ये नसल्याने नक्की भेटणारी व्यक्ती कोण असू शकेल ही उत्कंठा मनाला लागली होती परंतु दुसऱ्याच मॅसेजने ती उत्कंठा
द अनटोल्ड स्टोरी!
राहू दे मिठीत तुझ्या,दूर ढकलू नको,गुपित दोघातले,कुठे उकलू नको….ऑफिसमध्ये कामात गुंतून असल्याने आणि कामाने अगदीच अस्वस्थ झाल्याने जरा पाय लांब करून खुर्चीवरच रिलॅक्स झालो होतो.काम आटोपल्यानंतर फुलांचे,झाडांचे फोटो काढायचा आपला विशेष छंद पार पाडावा असा विचार मनात रेंगाळत होता तेवढ्यात बाजूला ठेवलेल्या मोबाईलवर फोन आला,नंबर अन्होंन होता पण खाली गोवा असं लोकेशन दाखवत होतं! वाटलं
तुझ्या कुशीत…
तुझ्या कुशीत मी शांत विसावतोअन तुझ्या मुलायम केसातुनहळूच हात फिरवतोतेंव्हा तू घट्ट मिटून घेतेस डोळे….माझ्या छातीवर जेंव्हाडोकं असतं तुझं निर्विकारपणेतेंव्हा असंख्य प्रश्न सुटलेले असताततुझ्या मनातले…तूही स्तब्ध अन् मीही स्तब्धचदोघांच्या मनात बोलायचं असतंबरच काही….सोडवायची असतात असंख्य कोडीअसंख्य प्रश्नेही….पण ओठांवर कधी ती येतच नाहीत..काय यालाच तर प्रेम म्हणत नाही?दूर असलो की तुझी आठवण का येतेहाच तर मोठा
तुझ्याशिवाय….
ना तू धोका दिलासना मी धोकेबाज होतोतू नाकारलसतोच माझ्या आयुष्याचाटर्निंग पॉईंट ठरला…माझ्यासमोर तेंव्हादोनच पर्याय होते,दोनच प्रश्न होते…..प्रेम की पोट ?मी पोट निवडलंअन् त्याचवेळीपोटासाठी पायपीट करण्यासमी कायमचा मोकळा झालो….तुझ्याशिवाय….
प्रेम असावं..
प्रेम असावं निरपेक्ष,आभाळासारखं निरभ्र….जीव ओतून केलेलं…निर्मळ आणि शूभ्र….मावळत्या सूर्यासारखी ऊबदारअसावी,सोबतीची जाणीव….सगळे आसपास असले…तरी…भासावी एक उणीव…सागरासारखा अथांग असावा विश्वास…..एक दुसऱ्यासाठीचघ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास….हातातून वाळूसारखे निसटून जातात कण…आयुष्यात अस्तव्यस्त,तुझ्या असण्याचे क्षण,का? कुठे, सलते तुझी एक एक आठवण…….
माझ्या नोकरीच्या प्रवासात.
माझ्या नोकरीच्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी घडून गेल्या,ज्या गोष्टींनी माझे किती भले झाले हे जरी सांगता येत नसले तरी माझ्या कृतीने कुणाचे तरी थोडेफार का होईना चांगले झाले असेल असे वाटते.आपल्या कठीण प्रसंगातही आपल्या हातून काहीतरी चांगले जेंव्हा घडते तेंव्हा तो आनंद,ते समाधान माणसाला शब्दात व्यक्त करता येत नाही.जीवन क्षणभंगुर आहे, आज आपण आहोत उद्या
ती….
कोणीही आजारी असलं की तीसतत दवाखान्यात चोवीस तासबसायची काळजी घेत….ती नेहमी म्हणायचीमाझ्या डोक्यावर पाय देऊनतू आलासउष्ट दूध प्यायला आईचं…ती भांडली,बोलली वा शिव्याहीदिल्या असतील तिनेअन् निघूनही गेली गळबळीतन सांगताचकायमची….राख्या दिसतात बाजारातभावांच्या हातांवरत्यांच्या बहिणींनी बांधलेल्याआतारिकामाच असतो माझा हातपोरका,अनाथ…..
ठेचा लागल्याशिवाय
■आयुष्यात जीवन जगताना ठेचा लागल्याशिवाय माणूस सुधरत नाही असं म्हटल्या जातं,ठेचा आणि चुका ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येईल.ठेचा परिस्थितीने लागल्या जातात तर चुका करणे हा मानवी स्वभाव असतो परंतु दोन्ही बाबतीत माणसाने योग्य पावले उचलली नाही तर त्या ठेचा,त्या चुका माणसाला माणसातून उठविल्याशिवाय राहत नाही आणि गंमत म्हणजे माणसाच्या हातून चूक झाल्याशिवाय ठेचा










