नांदगाव – मनातल्या नोंदी
मनातल्या कप्प्यातून…
तो जन्मलात्याच्या जन्माची बातमी मिळाली तेंव्हा पाठीवर पन्नास किलोची युरियाची बॅग होती,आधी एक मुलगी आणि हा दुसरा मुलगा म्हटल्यावर जो नैसर्गिक आनंद माणसाला होतो तोच आनंद मला झाला,पन्नास किलोची बॅग अलगद खाली ठेवली आणि सायकल एवढी दापटली की दोन किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटात पार केले,याचा जन्म झाला तेंव्हा सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली
मला आठवतात ते दिवस,आमच्या जीवनातले अत्यंत हलाखीचे दिवस होते ते,घरात सर्वात लहान असल्याने आई वडिलांचं अधिकचं प्रेम माझ्या वाट्याला आलं होतं आणि सर्वात लहान असल्याने आई वडिलांचा सहवास अधिक लाभला! आई वडील माझा हट्ट कोणत्याही स्थितीत पूर्ण करत असत आणि त्यावेळेस परिस्थितीही अशी होती की माझा हट्टही ना च्या बरोबरीचा असे,एखाद्या वेळेस महाग पेन घ्यावीशी
■हा प्रवास साधा सोपा नव्हताच मुळी! आणि माझ्या जीवनात मी जे काही केलं ते यशस्वी होण्यासाठी नव्हतं तर ते होतं स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी!मी माझ्या जीवनात काय केलं,किती कष्ट घेतले,आज इथपर्यंत कसा पोहचलो ही तर सांगण्याची गोष्टच नव्हे,जे केलं ते स्वतःसाठी केलं आणि स्वतःसाठी केलेल्या कामासाठी स्वतःचीच पाठ मला थोपटावीशी वाटत नाही,कोरोनाच्या भयाण
फेसबुक पोष्ट : माझ्या घराचं चित्र बघून अनेक मित्रानी मनाला सुखावून टाकणाऱ्या कमेंट्स दिल्या,मी अत्यंत सुखावून गेलो! घराला सहा वर्षे पूर्ण झाली त्याची आठवण म्हणून हा फोटो लावला होता! कोणाची नजर न लागो असे म्हणतात पण अशा नजरा माझ्या कोणत्याच गोष्टींना लागत नसतात नव्हे तशा भुक्कळ अंधश्रद्धाळू गोष्टींवर माझा विश्वास आधीही नव्हता,आत्ताही नाही,ज्या गोष्टीसाठी घाम
●आपण आपल्या जीवनात नेमकं काय कमावलं हे आजच्या दिवशी आपल्याला माहीत पडतं,तुमच्याकडे किती पैसा आहे,तुम्ही किती श्रीमंत आहात हे कोणी पाहत नाही,तुम्ही कधी,कुठे लोकांच्या किती कामी पडलात आणि लोकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब समाजात उमटत असते,मी इतरांसाठी खूप काही केलं असं अजिबात नाही माझ्याच्याने जे शक्य झालं ते प्रत्येक गोष्टीत करत
जीवनात काही गोष्टी अशा घडत गेल्या की माझ्यात थोडेबहुत का होईना परिवर्तन होत गेले,माझ्या जीवन जगण्याच्या तऱ्हा बदलत गेल्या,मी त्याच वेगाने बदलत गेलो,सुरुवातीला मी एक पक्का राजकारणी होतो,वडीलांपासून मिळालेले ते खानदानी गुण होते,राजकारणाच्या घोळात इतरांबद्दल द्वेषाची भावना कायम मनात रेंगाळत असायची,त्याने आपले वाईट करण्याचा प्रयत्न केला ना मग आपणही त्याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीशी वागायचं ही
रिमझिम पाऊस पडत होता,कदाचित मृगाचा तो पहिलाच पाऊस असावा! वातावरणात मंद असा मातीचा सुगंध पसरला होता,रिपरिप पडणाऱ्या पावसाचा स्पष्ट आवाज कानावर पडत होता,कित्येक वर्षानंतर मला तुला भेटायचं आहे केवळ एवढ्याच शब्दात एक मॅसेज मोबाईलवर आला होता,तिचा नंबर मोबाईलमध्ये नसल्याने नक्की भेटणारी व्यक्ती कोण असू शकेल ही उत्कंठा मनाला लागली होती परंतु दुसऱ्याच मॅसेजने ती उत्कंठा
राहू दे मिठीत तुझ्या,दूर ढकलू नको,गुपित दोघातले,कुठे उकलू नको….ऑफिसमध्ये कामात गुंतून असल्याने आणि कामाने अगदीच अस्वस्थ झाल्याने जरा पाय लांब करून खुर्चीवरच रिलॅक्स झालो होतो.काम आटोपल्यानंतर फुलांचे,झाडांचे फोटो काढायचा आपला विशेष छंद पार पाडावा असा विचार मनात रेंगाळत होता तेवढ्यात बाजूला ठेवलेल्या मोबाईलवर फोन आला,नंबर अन्होंन होता पण खाली गोवा असं लोकेशन दाखवत होतं! वाटलं
माझ्या नोकरीच्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी घडून गेल्या,ज्या गोष्टींनी माझे किती भले झाले हे जरी सांगता येत नसले तरी माझ्या कृतीने कुणाचे तरी थोडेफार का होईना चांगले झाले असेल असे वाटते.आपल्या कठीण प्रसंगातही आपल्या हातून काहीतरी चांगले जेंव्हा घडते तेंव्हा तो आनंद,ते समाधान माणसाला शब्दात व्यक्त करता येत नाही.जीवन क्षणभंगुर आहे, आज आपण आहोत उद्या
साहित्य चोरी बरी नसते.
कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी